Ayushman Bharat Yojana: भारत सरकारने 2018 मध्ये गरीब, दुर्बल व वंचित घटकांपर्यंत दर्जेदार वैद्यकीय सेवा पोहोचवण्यासाठी ‘आयुष्मान भारत योजना’ सुरू केली आहे. ही योजना म्हणजे देशातील सर्वसामान्य लोकांसाठी आशेचा किरण आहे, कारण आरोग्य सेवा मिळवणं पूर्वी खर्चिक आणि जड होते. या योजनेचा उद्देश असा आहे की, कोणत्याही आर्थिक अडचणीमुळे कोणताही भारतीय नागरिक उपचारांपासून वंचित राहू नये.
हि योजना प्रधानमंत्री ‘जन आरोग्य योजना’ (PMJAY) म्हणूनही ही ओळखली जाते, आणि आज ती जगातील सर्वात मोठ्या सरकारी आरोग्य विमा योजनांपैकी एक आहे. या योजनेत पात्र लाभार्थ्यांना दरवर्षी ₹5 लाखांपर्यंतच्या मोफत उपचाराचा लाभ दिला जातो, ज्यामध्ये गंभीर आजारांपासून किरकोळ शस्त्रक्रियांपर्यंत सर्व सेवा समाविष्ट आहेत.
या योजनेत सप्टेंबर 2024 पासून मोठा बदल केला आहे, तो म्हणजे सरकारने 70 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सर्व नागरिकांना, त्यांची आर्थिक स्थिती काहीही असो, या योजनेत समाविष्ट केले आहे. यासाठी त्यांना ‘आयुष्मान वय वंदन कार्ड’ प्रदान केले जाते.
आयुष्मान कार्ड कोणाला मिळणार नाही?
जरी ही योजना गरिबांसाठी राबवली जात असली तरीही या योजनेचा लाभ सर्वाना घेता येणार नाही. त्यासाठी सरकारने काही स्पष्ट निकष ठरवले आहेत, ज्यामुळे काही नागरिक वगळले जातात:
संघटित क्षेत्रात काम करणारे कर्मचारी: ज्यांचे उत्पन्न नियमित असून त्यांना कंपनीमार्फत अन्य विमा योजना उपलब्ध आहेत.
आयकर भरणारे नागरिक: ज्यांची आर्थिक स्थिती चांगली आहे आणि ते दरवर्षी आयकर भरतात.
ईएसआयसी (ESIC) चा लाभ घेणारे कर्मचारी: ज्यांना आधीपासूनच दुसऱ्या आरोग्य सुविधांचा लाभ मिळतो.
पीएफ (Provident Fund) साठी वेतनातून कपात होणारे कर्मचारी: जे औपचारिक आर्थिक संरचनेत समाविष्ट आहेत.
या नियमांचा महत्वाचा उद्देश म्हणजे योजना फक्त गरजूं नागरिकांनाच याचा फायदा झाला पाहिजे, कि जे स्वतःच्या खर्चाने चांगली आरोग्यसेवा घेऊ शकत नाहीत.

कोण पात्र आहेत?
सरकारने ज्या लोकांना खरोखर गरज आहे अशा घटकांना योजना दिली आहे: Ayushman Bharat Yojana
ग्रामीण भागातील पात्रता: ज्या कुटुंबांकडे पक्के घर नाही (कच्ची घरे), कुटुंबात 16-59 वयोगटातील कोणताही कमावता प्रौढ नाही, अनुसूचित जाती (SC) व अनुसूचित जमाती (ST) मधील कुटुंब, जे भूमिहीन शेत मजूर आहेत आणि स्वतःच्या उपजीविकेसाठी जे शेतीकाम किंवा मजुरीवर अवलंबून आहेत असे सर्व.
शहरी भागातील पात्रता: रस्त्यावर विक्री करणारे (Street Vendors), घरकाम करणारे (Domestic Helpers), बांधकाम क्षेत्रात मजुरी करणारे (Construction Laborers), कचरा वेचक (Waste Pickers) आणि सफाई कर्मचारी असे शहरी भागातील पात्र नागरिक.
(Reference: SECC-2011 सर्वेक्षणानुसार पात्रता निश्चित केली जाते.)
आयुष्मान कार्डचे फायदे
आयुष्मान कार्ड मिळाल्यावर नागरिकांना मिळणारे फायदे अत्यंत महत्त्वाचे आहेत: Ayushman Bharat Yojana
₹5 लाखांपर्यंत मोफत उपचार: आपण लहान मोठ्या आजारांवर कोणताही आर्थिक बोजा न पडता उपचार घेऊ शकतो.
25,000+ हॉस्पिटल नेटवर्क: देशभरातील सरकारी व खासगी रुग्णालयांमध्ये थेट दाखल होऊन उपचार करता येतात.
कॅशलेस हॉस्पिटलायझेशन: रुग्णालयात दाखल होताना तुम्हाला कोणतीही रक्कम भरावी लागत नाही.
गंभीर आजारांवर मोफत उपचार: हृदयविकार, कॅन्सर, किडनी रोग, मोठी शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्यास पूर्णपणे खर्चमुक्त सेवा मिळते.
ही योजना म्हणजे गरीबांसाठी संजीवनी असून, आरोग्य सेवा सर्वदूर पोहचण्याची सुनिश्चिती करणारी आहे.
आयुष्मान कार्ड कसे मिळवायचे?
आपण आयुष्मान योजनेचा लाभ घेऊ शकतो का, हे तपासण्यासाठी अगदी सोपी ऑनलाईन पद्धत आहे:
ऑनलाईन तपासणी प्रक्रिया: सर्वप्रथम आयुष्मान भारत योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. तेथे ‘Am I Eligible’ या पर्यायावर क्लिक करा. तुमचा मोबाईल नंबर टाका व आलेला OTP सबमिट करा. तुमचे राज्य व जिल्हा निवडून शोधा. जर तुमचे नाव यादीत असेल तर तुम्ही कार्डसाठी पात्र आहात.
Ayushman Bharat Yojana थेट लिंक – Eligibility तपासा (Click Here) ही संपूर्ण प्रक्रिया अगदी सोपी, जलद व पारदर्शक आहे.

जर नाव यादीत नसेल तर काय करायचं?
जर तुमचं नाव यादीत दिसत नसेल तर घाबरण्याचं काहीच कारण नाही. आपल्या जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) किंवा आरोग्य केंद्राशी संपर्क साधा. SECC-2011 डेटा अपडेटसाठी अर्ज करा. अनेक राज्य सरकारांनी या योजनेसाठी स्वतंत्र योजना राबवल्या आहेत जसे की, महाराष्ट्रात ‘महात्मा फुले जन आरोग्य योजना’, ज्याचा लाभ घेता येतो. थोडासा प्रयत्न केल्यास तुम्ही देखील या हक्काचा मोफत आरोग्य विमा मिळवू शकता.
महत्वाची अपडेट – एप्रिल २०२५
70 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांसाठी नवीन ‘आयुष्मान वय वंदन कार्ड’ सुरू झाले आहे. या नवीन कार्डासाठी कोणतीही आर्थिक मर्यादा नाही. म्हणजेच कोणताही वृद्ध नागरिक मोफत आरोग्यसेवा मिळवू शकतो. महाराष्ट्रातील नागरिकांसाठी महात्मा फुले योजना आणि PMJAY दोन्ही योजनेचा एकत्रित लाभ घेण्याची संधी उपलब्ध आहे.
Ayushman Bharat Yojana
आयुष्मान भारत योजना म्हणजे भारतातील गरीब आणि गरजू नागरिकांना निरोगी जीवन जगण्याची संधी देणारी एक ऐतिहासिक योजना आहे. आर्थिक अडचणींमुळे कोणत्याही व्यक्तीला आपला आरोग्याचा हक्क गमवावा लागू नये, यासाठी सरकारने ही योजना सुरू केली आहे. तुम्ही जर वरील पात्रतेत बसत असाल, तर वेळ वाया घालवू नका – आजच तुमचं नाव ऑनलाईन तपासा आणि आयुष्मान कार्डसाठी अर्ज करा.
आरोग्य ही खरी संपत्ती आहे, आणि आयुष्मान भारत योजना तुमचं आरोग्य सुरक्षित करण्यासाठी नेहमी तुमच्या पाठीशी उभी आहे. चांगल्या आरोग्यासाठी आजच पाऊल उचला आणि आयुषमान कार्डचा लाभ घ्या!
Ayushman Bharat Yojana external links: https://pmjay.gov.in/
Table of Contents