Heat stroke in marathi: महाराष्ट्रातील बहुतेक सर्व भागांत सध्या प्रखर उन्हाळ्याचा कहर सुरू असून तापमान ४१ अंश सेल्सिअसच्या वर गेले आहे. उन्हाच्या या तीव्र झळांमुळे रस्त्यावर फिरणेही कठीण झाले आहे, मग शेतातील कष्टाची कामे करताना काय हाल होत असतील याची कल्पनाच न करणे हेच बरे! पण अनेक शेतकरी बंधूंना सकाळी दहा वाजल्यानंतर देखील शिवारात काम करणे भाग पडते, कारण समोर असलेला खरीप हंगाम आणि त्याची वेळ निघून जाऊ नये म्हणून ते कष्ट टाळू शकत नाहीत.
याच पार्श्वभूमीवर उष्माघात म्हणजे काय आणि त्यापासून वाचण्यासाठी शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी याचा सविस्तर आढावा या लेखामध्ये घेतला आहे त्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा आणि आपल्या शेतकरी बांधवाना पुढे शेअर करा.
उष्माघात म्हणजे काय आणि का होतो?
उष्माघात म्हणजे शरीरातील तापमान अचानक वाढणे आणि शरीर थंड राखणारी यंत्रणा काम करणे थांबणे. साधारणतः शरीराचे तापमान १०४°F (४०°C) पेक्षा जास्त झाल्यास ही स्थिती गंभीर बनते. उन्हात काम करताना किंवा जास्त वेळ उन्हात थांबल्याने शरीरातून घामाद्वारे होणारे थंडावणे बंद होते, त्यामुळे उष्माघात होतो. हे एक वैद्यकीय आणीबाणीचे लक्षण आहे आणि यावरती त्वरित उपचार करणे आवश्यक असते.
उष्माघाताची प्रमुख लक्षणे खालीलप्रमाणे आहेत
- अचानक डोके दुखू लागणे किंवा झणझणीत दुखणे
- अत्याधिक घाम येणे किंवा कधी कधी घामच बंद होणे
- उलटी होणे, मळमळ वाटणे
- चक्कर येणे, अस्वस्थ वाटणे
- अंगातील ताकद हरपणे
- भान हरपणे किंवा शुद्ध हरपणे
ही लक्षणे जाणवताच वेळ न दवडता सावलीत जावे, थंड पाणी प्यावे आणि गरज असल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

उन्हाळ्यात शेतकऱ्यांवर येणारे विशेष धोके
उन्हाळी हंगामात खरीप पिकांची तयारी सुरू असते. यामध्ये शेतीची मशागत करणे, खते टाकणे, निंदण, आंतरमशागत यांसारखी कामे करावी लागतात. हंगामाच्या या टप्प्यावर काम टाळणे शक्य नसते. सकाळी लवकर उठून जनावरांचे दूध काढणे, त्यांची वैरण-पाणी देणे, त्यानंतर शेतात जायला लागते. तेव्हा दहा-अकरा वाजतात आणि तोपर्यंत उन्हाची तीव्रता कमालीची वाढलेली असते.
यामुळे घामाघूम होणे, थकवा जाणवणे, भूक मंदावणे आणि अशक्तपणा येणे अशा सामान्य गोष्टी होतात. दुपारच्या वेळेस तर शिवारात सामसूमच असते. कोणताही शेतकरी त्या झळांमध्ये काम करणे टाळतो. त्यामुळे हेच लक्षात येते कि की उष्माघाताचा धोका किती गंभीर असतो.
शेतकऱ्यांनी घ्यावयाच्या अत्यावश्यक काळजीच्या उपाययोजना
योग्य वेळेची निवड: सकाळी ७ ते १० वाजेपर्यंत व सायंकाळी ४ ते ६ या वेळेतच शेतीची कामे करावीत. दुपारी १२ नंतर सूर्यप्रकाश अतिशय तीव्र असतो. त्यामुळे या वेळात शेतात काम करणे टाळावे. शक्य असल्यास या वेळेत शरीराला आराम द्यावा.
भरपूर पाणी आणि द्रवपदार्थ: शरीर निर्जलीकरण होणे म्हणजेच dehydration हा उष्माघाताचा प्रमुख कारण असतो. त्यामुळे दर अर्ध्या तासाला थोडे थोडे पाणी प्यावे. लिंबूपाणी, ताक, नारळपाणी किंवा साखर-मीठ पाणी हे शरीरातील क्षार टिकवून ठेवतात. यामुळे शरीराला थंडावा मिळतो आणि थकवा येत नाही.
योग्य पोशाख: घाम लगेच सुकणारे सुती आणि सैलसर कपडे घालावेत. काळ्या किंवा गडद रंगाचे कपडे टाळावेत कारण ते उष्णता शोषतात. डोक्यावर टोपी, गमछा किंवा ओले रूमाल ठेवावेत. पायाला चपला किंवा बूट आणि डोळ्यांना गॉगल्स वापरावेत.
सावलीचा वापर: शेतात किंवा शिवारात काम करताना जवळपास सावली उपलब्ध आहे का हे पाहावे. काम करताना मधूनमधून सावलीत जाऊन विश्रांती घ्यावी. झाडाच्या सावलीचा, गोठा, तंबू, घरट्यांचा वापर करावा.

उष्माघाताची लक्षणे जाणवली तर काय करावे?
वरील पैकी कोणतेही उष्माघाताचे लक्षण जाणवले तर लगेच काम थांबऊन सावलीत जा, थोडे थोडे पाणी प्या किंवा ORS घ्या, गार पाण्याने संपूर्ण अंग पुसा, आपल्या डोक्यावर थंड पाण्याचे कापड ठेवा, शक्य असल्यास जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जा
Heat stroke in marathi
शेतकऱ्यांनी हंगामाच्या घाईमध्ये स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये. उष्माघात हा एक गंभीर विषय आहे. योग्य काळजी, सावधपणा आणि आवश्यक सुविधा वापरून आपण त्याचा धोका टाळू शकतो.
आजचा शेतकरी आधुनिक तंत्रज्ञान आणि माहितीचा उपयोग करून आपल्या शेतीला प्रगतीकडे नेतोय, तसंच त्याने आपल्या शारीरिक स्वास्थ्याकडेही तितकंच लक्ष देणं गरजेचं आहे. कारण तुमचं आरोग्य टिकेल, तरच शेती चालेल आणि अन्नधान्याची शाश्वती टिकेल.
Heat stroke in marathi: भारतीय हवामान विभाग – तापमान माहिती
तुम्हाला हा Heat stroke in marathi लेख उपयोगी वाटला का? खाली तुमचं मत जरूर लिहा आणि हा लेख शेअर करून इतर शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवा!
Table of Contents