New toll policy: केंद्रीयमंत्री मा. नितीन गडकरी यांनी धमाकेदार घोषणा केली आहे, ती म्हणजे भारतातील कोणत्याही रस्त्यावरच्या प्रवासासाठी लागणारा टोलसाठी आता फक्त ₹3000 वार्षिक द्यावे लागणार आहेत आणि त्यासोबतच तुम्ही अनलिमिटेड प्रवास सुद्धा करू शकता! देशभरातील राष्ट्रीय महामार्गांवर टोल फी भरण्याची पद्धत लवकरच बदलणार असल्याची शक्यता आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नुकत्याच एका सार्वजनिक कार्यक्रमात जाहीर केलं की, पुढील 15 दिवसांत नवे टोल धोरण लागू करण्याचा विचार सुरू आहे. हे धोरण लागू झाल्यावर नागरिकांना टोल प्लाझावर गाड्या थांबवून पैसे भरावे लागणार नाहीत. फास्टॅगच्या आधारे थेट फास्ट लेनमधून प्रवेश मिळणार, त्यामुळे वेळ आणि इंधन वाचणार आहे. टोल बूथवर होणारा वेळेचा अपव्यय, गर्दी, आणि कर्मचाऱ्यांशी होणारे वाद यामुळे टळणार आहेत.

वार्षिक ₹3000 मध्ये टोल पास
या नव्या New toll policy धोरणानुसार, खासगी चारचाकी गाडी चालवणाऱ्या वाहन मालकांनी फक्त एकदाच वार्षिक ₹3000 फी भरल्यास, तुम्ही एका शहरातून दुसऱ्या शहरात जाताना कुठेही टोल द्यावा लागणार नाही. म्हणजेच, देशभरातील टोल प्लाझांवर एकाच शुल्कात अनलिमिटेड प्रवेश मिळणार आहे. ही योजना अशा लोकांसाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे जे दर महिन्याला किंवा वर्षातून अनेक वेळा लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी महामार्गाचा वापर करतात. सध्या टोल भरण्यासाठी प्रत्येक प्रवासात वेळ आणि पैसे खर्च होत असतो, परंतु वार्षिक फिक्स्ड फी प्रणालीमुळे हा त्रास कायमचाच दूर होणार आहे.
कोणासाठी किती टोल?
या नवीन New toll policy प्रस्तावामध्ये सध्या फक्त खासगी चारचाकी गाड्यांसाठी ₹3000 वार्षिक टोल पास ची योजना निश्चित करण्यात आली आहे.
दुचाकी वाहनांसाठी नेहमीप्रमाणे टोल माफ ठेवण्यात येणार आहे, म्हणजे त्यांना कुठेही पैसे भरावे लागणार नाहीत. मोठ्या व्यापारी मालवाहू गाड्यांसाठी आणि टॅक्सी/कमर्शियल वाहनांसाठी किती टोल आकारला जाईल याबाबत मात्र अद्याप सरकारने निर्णय घेतलेला नाही. शासन लवकरच सर्व प्रकारच्या वाहनांसाठी वेगवेगळे दर जाहीर करेल, अशी शक्यता आहे.
₹3000 मध्ये किती फायदा?
जर एखादी खासगी कार दरवर्षी केवळ 4 वेळा 500 किमी प्रवास करत असेल, तर सध्याच्या टोल दरांनुसार प्रत्येक प्रवासासाठी सुमारे ₹2100 ते ₹2400 इतका खर्च येतो. म्हणजेच वर्षभरात टोलसाठी एकूण ₹6000 ते ₹6500 खर्च होतो. परंतु जर वाहन मालकाने फक्त ₹3000 वार्षिक टोल पास एकदाच घेतला, तर त्यांना दुप्पटपेक्षा अधिक बचत होईल. जर त्यांनी महिन्यातून एकदा तरी लांब प्रवास केला तरीही ही योजना तुमच्यासाठी आर्थिकदृष्ट्या अत्यंत फायदेशीर ठरेल.
पेट्रोल व डिझेल वाहने काय नियम असतील?
या New toll policy धोरणात जुनी गाड्यांसाठी म्हणजेच: 15 वर्षांहून अधिक जुनी पेट्रोल गाडी/10 वर्षांहून अधिक जुनी डिझेल गाडी- यांच्याकरिता लाइफटाईम टोल पास उपलब्ध करून देण्याची चर्चा होती, पण त्यावर अद्याप सरकारकडून अंतिम निर्णय झाला नाही. तरीही, दरवर्षी टोल पास घेण्याचा पर्याय खुला ठेवण्यात येणार आहे, त्यामुळे वापरकर्त्यांना त्यांच्या सोयीप्रमाणे योजना निवडता येईल. सरकारच्या धोरणात भविष्यात आणखी बदल केले जातील, त्यामुळे अधिक स्पष्टता लवकरच मिळण्याची अपेक्षा आहे.

NHAI काय म्हणते?
या New toll policy धोरणाबाबत नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया (NHAI) च्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, अद्याप ही योजना नियोजनाच्या प्राथमिक टप्प्यात आहे. यावर अजून अंतिम निर्णय झालेला नाही आणि अंमलबजावणीसाठी अजून काही वेळ लागणार आहे. त्यामुळे टोल पासची अचूक किंमत, प्रक्रिया, आणि सुरुवात कधीपासून होणार हे सांगणे अजूनही थोडे अवघड आहे. सरकार आणि संबंधित विभाग यात कसून काम करत असून लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.
New toll policy
ही योजना प्रत्यक्षात आल्यास, भारतातील कोट्यवधी प्रवाशांसाठी ही एक क्रांतिकारी आणि दिलासादायक योजना ठरेल. वेळ, इंधन, आणि टोलसाठीचा खर्च मोठ्या प्रमाणावर कमी होणार आहे. विशेषतः नियमितपणे प्रवास करणाऱ्या व्यक्ती, कुटुंबीय, व कामासाठी बाहेर पडणाऱ्यांसाठी हे स्वस्त व सोयीचे टोल सोल्यूशन ठरेल.
New toll policy external links: https://tis.nhai.gov.in/
Table of Contents