PM Kisan Recovery : पीएम किसान योजनेतील ‘अपात्र’ शेतकऱ्यांकडून केंद्र सरकार करत आहे रकमेची वसुली! जाणून घ्या सविस्तर माहिती.

PM Kisan Recovery : लवकरच PM Kisan Yojana अंतर्गत २० वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. मात्र त्याआधीच सरकारने एक मोठी मोहीम राबवण्यास सुरुवात केली आहे. जे शेतकरी या योजनेसाठी अपात्र ठरले आहेत, त्यांच्याकडून आधीचे मिळालेले हप्ते म्हणजेच निधी परत घेण्याची वसुली प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या माहितीनुसार, अनेक शेतकऱ्यांनी चुकीची माहिती देऊन पीएम किसान योजनेचा लाभ घेतला होता. आता अशा अपात्र शेतकऱ्यांची ओळख पटवल्यानंतर, त्यांच्याकडून तब्बल ₹416 कोटी इतकी रक्कम वसूल केली जात आहे. ही वसुली देशभरातील विविध राज्यांतील लाभार्थ्यांकडून केली जात आहे, ज्यात आयकरदाते, सरकारी कर्मचारी, सार्वजनिक क्षेत्रातील नोकरी करणारे आणि इतर अपात्र वर्गातील शेतकरी सहभागी आहेत.

अपात्र शेतकऱ्यांची यादी

सरकारने योजनेतील पात्रता निकष कठोर केले असून, जमिनीच्या नोंदींची पडताळणी, आधार ओळख (Aadhaar Authentication), ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया अनिवार्य केली आहे. तसेच, ग्रामसभांच्या माध्यमातून लाभार्थ्यांच्या यादीचे ऑडिट करणे आणि पाच टक्के शेतकऱ्यांची नियमित पडताळणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

PM Kisan Recovery
PM Kisan Recovery

या तपासणीतून ज्या शेतकऱ्यांना अपात्र ठरवले गेले आहे, त्यांना योजनेतून वगळले जात असून पूर्वी मिळालेला निधी स्वतःहून परत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मात्र, ही प्रक्रिया सध्या ऐच्छिक स्वरूपाची असल्यामुळे अनेक ठिकाणी प्रशासनाकडून फारशी कडक कारवाई होताना दिसत नाही.

वसुली मोहिमेला प्रतिसाद

सध्याच्या परिस्थितीत ही वसुली मोहीम फारशी प्रभावी ठरत नसल्याचेही स्पष्ट होत आहे. कोणतीही ठोस कायदेशीर तरतूद नसल्यामुळे, अधिकाऱ्यांना वसुली प्रक्रियेसाठी सक्ती करता येत नाही. त्यामुळे अनेक अपात्र शेतकरी अजूनही निधी परत करत नाहीत. यामुळे सरकारवर टीका होत असून, “जेव्हा हे शेतकरी अपात्र होते, तेव्हा त्यांना योजनेतून का वगळले गेले नाही?” असा प्रश्न विचारला जात आहे.

PM Kisan Recovery

पीएम किसान योजनेचा उद्देश गरजू व खऱ्या शेतकऱ्यांपर्यंत आर्थिक मदत पोहोचवण्याचा आहे. मात्र, अपात्र शेतकऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने हा लाभ घेतल्याने खऱ्या लाभार्थ्यांवर अन्याय होतो. सरकारने सुरू केलेली ही वसुली मोहीम योग्य दिशेने असली, तरी तिची अंमलबजावणी अधिक प्रभावी आणि कायदेशीरदृष्ट्या मजबूत करणे आवश्यक आहे. यामुळेच योजनेचा लाभ खरी पात्र लोकांपर्यंत पोहोचेल आणि निधीचा अपव्यय टाळता येईल.

PM Kisan Recovery link: https://pmkisan.gov.in/

Please enable JavaScript in your browser to complete this form.
Contact us
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now