LIC New Jeevan Shanti yojana: एलआयसीची ‘न्यू जीवन शांती’ ही एक अशी विमा योजना आहे, जी तुम्हाला आर्थिक स्वावलंबन प्रदान करते. विशेषतः निवृत्तीनंतरचे जीवन सुरळीत चालावे यासाठी ही योजना उपयुक्त ठरते. यात एकदाच एक ठराविक रक्कम गुंतवून तुम्ही आजीवन दरमहा किंवा दरवर्षी निश्चित पेन्शन मिळवू शकता.
सरकारी नोकरीतील कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर पेन्शन मिळते, पण खासगी क्षेत्रात काम करणाऱ्यांना हा लाभ सहसा मिळत नाही. त्यामुळे वयोमानानुसार उत्पन्नाच्या सततच्या स्रोताची नितांत गरज भासते आणि LIC ची ही योजना त्या गरजांची पूर्तता करते. या योजनेत गुंतवणूक करून तुम्ही तुमच्या वृद्धापकाळातील आर्थिक सुरक्षेसाठी भक्कम पाऊल उचलू शकता. या लेखा मध्ये, या योजनेबद्दल अधिक माहिती सांगितली आहे, त्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा आणि इतरांना शेअर करा
जीवन शांती योजनेची वैशिष्ट्ये आणि फायदे
LIC New Jeevan Shanti yojana मध्ये गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तीस काही अतिशय महत्त्वाचे फायदे मिळतात.
1. एकदाच गुंतवणूक – आयुष्यभर निश्चिंततेचा अनुभव: या योजनेत फक्त एकदाच सिंगल प्रीमियम भरायचा आहे. एकदा पैसे भरल्यानंतर तुम्ही वर्षानुवर्षे, तहयात ठराविक पेन्शनचा लाभ घेऊ शकता. हा प्लॅन म्हणजे तुमच्या आर्थिक कामाचे कमाईचे एक निश्चित आणि दीर्घकालीन आर्थिक स्त्रोत आहे.
2. बाजाराच्या चढ-उतारांपासून संरक्षण: शेअर बाजारातील अस्थिरता किंवा आर्थिक मंदीचा या योजनेच्या पेन्शनवर कोणताही परिणाम होत नाही. एकदा ठरलेली रक्कम आयुष्यभर मिळते. त्यामुळे मनःशांती आणि सुरक्षा दोन्ही मिळते.
3. वृद्धापकाळात सुरक्षित आयुष्य: निवृत्तीनंतर प्रत्येकाची इच्छा असते की, कोणत्याही आर्थिक अडचणीशिवाय सन्मानाने जीवन जगता यावे म्हणूनच, ही योजना तुम्हाला प्रत्येक महिन्याला गरजेच्या खर्चासाठी आणि आयुष्यभरासाठी निश्चित उत्पन्न देत राहते.
4. कर बचतीची संधी व कर्ज सुविधा: ही योजना घेतल्यावर, तुम्ही काही कर सवलतीचा (Tax Benefits) लाभ घेऊ शकता.
तसेच गरज भासल्यास या योजनेवर सहज कर्ज मिळवता येते, जे आपत्कालीन परिस्थितीत मदतीचा हात ठरते.

गुंतवणुकीच्या अटी आणि शर्ती
LIC New Jeevan Shanti yojana मध्ये गुंतवणुकीसाठी काही सोप्या आणि व्यावहारिक अटी आहेत. या योजनेत सहभागी होण्यासाठी किमान वय 30 वर्षे आणि कमाल वय 79 वर्षे ठेवण्यात आले आहे. गुंतवणूक करण्यासाठी किमान रक्कम ₹1.5 लाख इतकी आहे, आणि वरच्या मर्यादेवर कोणताही बंधन नाही.
- एकदाच प्रीमियम भरणे आवश्यक: (Single Premium Plan)
- किमान गुंतवणूक रक्कम: ₹1.5 लाख
- कमाल गुंतवणुकीवर मर्यादा नाही: अधिक गुंतवणूक, अधिक पेन्शन
- वयोमर्यादा: किमान वय: 30 वर्षे, कमाल वय: 79 वर्षे
या अटी सर्वसामान्य नागरिकांच्या गरजांना ध्यानात घेऊन तयार करण्यात आल्या आहेत. तुम्ही तुमच्या गरजेनुसार जितकी अधिक गुंतवणूक कराल तितकी जास्त पेन्शन मिळवू शकता. एकदाच गुंतवणूक केल्यावर तुम्हाला पेन्शन मिळण्याची गॅरंटी LIC देते, जी भारतातील सर्वात विश्वासार्ह विमा कंपनी आहे.
गुंतवणुकीनुसार पेन्शनची रक्कम कशी ठरते?
LIC New Jeevan Shanti yojana मध्ये तुमच्या गुंतवणुकीच्या रकमेवर आधारित पेन्शन ठरते. जितकी जास्त गुंतवणूक, तितकी जास्त पेन्शन मिळते. उदाहरणार्थ, जर एका 40 वयाच्या स्त्री किंवा पुरुष उमेदवाराने ₹25 लाख सिंगल प्रीमियम या योजनेत गुंतवले आणि याचा डेफेरमेन्ट पिरियड 5 वर्ष निवडला तर, त्याच्या वयाच्या 45 वयापासून त्याला ₹2,19,875 इतकी पेन्शन संपूर्ण आयुष्यभर मिळत राहील.
पेन्शन प्रकार (Pension Type) | पेन्शन रक्कम (Pension Amount) |
वार्षिक पेन्शन (Yearly Pension) | ₹2,19,875 |
अर्धवार्षिक पेन्शन (Half Yearly Pension) | ₹1,07,739 |
त्रैमासिक पेन्शन (Quarterly Pension) | ₹53,320 |
मासिक पेन्शन (Monthly Pension) | ₹17,590 |
पेन्शनची रक्कम दरमहिन्याला, दर तीन महिन्यांनी, सहा महिन्यांनी किंवा दरवर्षी घेण्याचा पर्याय उपलब्ध आहे. त्यामुळे तुमच्या गरजेनुसार लवचिकता उपलब्ध होते. ही पेन्शन रक्कम तुमच्या रोजच्या गरजा पूर्ण करायला मोठा हातभार लावते आणि आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बनवते.
मृत्यूनंतर कुटुंबाला मिळणारे फायदे
LIC New Jeevan Shanti yojana मध्ये एक खास वैशिष्ट्य आहे की, पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतर, त्याच्या नामनिर्देशित व्यक्तीस मूळ गुंतवणूक रक्कम आणि त्यावर व्याज परत मिळते. त्यामुळे ही योजना केवळ व्यक्तीपुरती मर्यादित राहत नाही तर संपूर्ण कुटुंबासाठी आर्थिक आधार ठरते. जर अचानक काही विपरीत घडले तरीही, गुंतवलेली रक्कम सुरक्षित राहते.

या सुविधेमुळे, वृद्धापकाळात किंवा आपत्कालीन परिस्थितीत कुटुंबाची आर्थिक घडी कोसळत नाही. म्हणूनच LIC New Jeevan Shanti yojana हा एक परिपूर्ण संरक्षण देणारा पर्याय मानला जातो.
सरेंडर व कर्ज सुविधा
LIC New Jeevan Shanti yojana मध्ये आणखी एक महत्वाचा फायदा म्हणजे गरज पडल्यास पॉलिसी सरेंडर करता येते. या योजनेची सरेंडर व्हॅल्यू अन्य अनेक पॉलिसींशी तुलना करता जास्त आहे. त्यामुळे जर काही अपरिहार्य गरज उद्भवली, तर गुंतवलेली रक्कम काढता येते. याव्यतिरिक्त, पॉलिसीधारक कधीही या योजनेवर कर्ज घेऊ शकतो.
एलआयसी न्यू जीवन शांती योजना कोणासाठी योग्य हे?
ही योजना प्रामुख्याने अशा व्यक्तींसाठी योग्य आहे ज्यांना त्यांच्या उतरत्या काळामध्ये नियमित आणि निश्चित उत्पन्न हवे आहे. खासगी नोकरी करणारे, लहान व्यावसायिक, स्व-रोजगार करणारे उद्योजक, किंवा नियमित उत्पन्नाची गरज असलेले असे सर्वजण या योजनेचा फायदा घेऊ शकतात. हि योजना सर्वांसाठी योग्य आहे.
जर तुम्ही तुमचे वृद्धापकाळातले आयुष्य आर्थिक तणावाशिवाय घालवू इच्छित असाल, तर LIC New Jeevan Shanti Plan तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे. त्यातून आयुष्यभर मिळणारी सुरक्षितता आणि हमखास पेन्शन हे तुमच्या स्वप्नातील निवृत्तीचे जीवन घडवण्यास मदत करेल.
एलआयसी न्यू जीवन शांती योजना अर्ज कसा करावा?
LIC New Jeevan Shanti yojana मध्ये अर्ज करणे अतिशय सोपे आहे. तुम्ही जवळच्या एलआयसी शाखेमध्ये जाऊन तिथे अर्ज करू शकता. किंवा तुमच्या अधिकृत एलआयसी विमा प्रतिनिधी यांची मदत घेऊन, तुमच्या गरजेनुसार योग्य सल्ला घेता येतो आणि हि योजना सुरु करू शकता. अर्ज करताना काही आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी लागते जसे की आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पास बुक झेरॉक्स, पासपोर्ट साईज फोटो इ. अर्ज स्वीकारल्यानंतर गुंतवणूक प्रक्रिया पूर्ण केली जाते आणि तुमच्या नावावर योजना सुरू होते.

सण 2025 मध्ये LIC ने आपल्या New Jeevan Shanti योजनेमध्ये काही महत्त्वाचे अपडेट्स केले आहेत. आता KYC प्रक्रिया अधिक सोपी आणि डिजिटल पद्धतीने पूर्ण केली जाऊ शकते. अर्जाची प्रक्रिया जलद झाली असून, गुंतवणुकीनंतर थोड्याच दिवसांत पेन्शन रक्कम सुरू होते.
या योजनेच्या माध्यमातून अधिक लवचिक पेन्शन पर्याय उपलब्ध झाले आहेत, जे विविध वयोगटातील गुंतवणूकदारांना त्यांच्या गरजेनुसार योजना निवडण्याची मुभा देतात. या नवीन बदलांमुळे ही योजना आणखी उपयुक्त व आकर्षक बनली आहे.
LIC New Jeevan Shanti yojana
आर्थिक स्थैर्य म्हणजे केवळ गरज नव्हे तर सुरक्षित भविष्याची हमी आहे. LIC New Jeevan Shanti Plan तुमच्या निवृत्तीनंतरच्या जीवनात आर्थिक चिंता दूर करून शांतीचा अनुभव देते. फक्त एकदाच केलेली शहाणपणाची गुंतवणूक तुम्हाला आयुष्यभर निश्चित उत्पन्न मिळवून देते.
वृद्धापकाळात हसत-खेळत, कोणत्याही आर्थिक अडचणीशिवाय जीवन जगण्यासाठी, ही योजना आदर्श आहे. तुम्ही आज गुंतवणूक केल्यास, उद्या तुम्ही आणि तुमचे कुटुंब सुरक्षित आणि सन्मानाने जगू शकाल. म्हणून, उशीर न करता आजच एलआयसी न्यू जीवन शांती योजनेचा लाभ घ्या आणि तुमच्या भविष्यासाठी आर्थिक कवच उभारा.
LIC New Jeevan Shanti Plan external links: https://licindia.in/web/
Table of Contents